रविवार, ३० जानेवारी, २०२२

उपेक्षित मराठवाड्याच्या अपेक्षा

उपेक्षित मराठवाड्याच्या अपेक्षा
उपेक्षित मराठवाड्याच्या अपेक्षा


आज कित्येक दिवसांनी माझा मराठवाडा अंधारातून लख्ख प्रकाशाकडे पाऊल टाकण्याचे दिशेने निघालाय असं मला वाटतंय...एका नवीन वळणावर विकासाच्या दिशेने आता आपल्या मराठवाड्याची रेल्वे धावणार..आता ती पेसेंजर सारखी संथ गतीने पळणार का मग सुपरफास्ट एक्स्प्रेसचा वेग घेणार हे तर वेळच ठरवेल.
   परिस्थिती कशी सतत बदलत असते याचा प्रत्यय माझ्यासह प्रत्येक मराठवाडा व औरंगाबादच्या जनसमुदायाला काल झालेल्या मोदी मंञिमंडळ पुनर्विस्तारातुन आलाच असेल.बघता बघता एक नाही तर दोन केंद्रीय राज्यमंत्री पदे आपल्या मराठवाड्याच्या वाटाल्या आले.आणि कित्येक वर्षांपासून डावलल्या गेलेल्या महाराष्ट्राला डॉ.भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांच्या प्रतीने केंद्रात सर्वात महत्वाचे असे अर्थ राज्यमंत्रीपद व रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाले. अखंड मराठवाड्याच्या विकासाच्या आशा पल्लवीत झाल्याय.बातमी ऐकल्यानंतर प्रत्येकालाच सुखाचा धक्का बसला असणार हे मात्र नक्की!
   
आतापर्यंत मुळातच मराठवाडा राजकीयदृष्टया वंचित राहिला आहे. त्यामुळे मनुष्यबळ, पाण्याची व जागेची उपलब्धता असुन देखील पुणे मुंबईच्या तुलनेत औरंगाबादचा विकास खुपच कमी झालेला आहे.
मोदी सरकारने केंद्रात एकाचवेळी मराठवाड्यातील दोन खासदारांना अर्थ राज्य व रेल्वे राज्य मंत्रिपद देऊन एकप्रकारे मराठवाड्यात एक राजकीय प्राण ओतला आहे.

रावसाहेब दानवेंनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक रेल्वेमार्ग लवकरात लवकर मार्गी लागावे तसेच प्रस्तावित मेट्रोमार्ग सुद्धा लवकर व्हावेत.  

औरंगाबाद ही राज्याची पर्यटन राजधानी, वेरूळ, अजिंठा, दौलताबाद सारखी जागतिक पातळीवर पर्यटन क्षेत्रे येथे आहे, तसेच अनेक पर्यटन क्षेत्रांचा विकास व्हावा व त्यांना रेल्वे पर्यटन नकाशावर स्थान द्यावे."Narrow gaje" रेल्वेलाईन बनवून ही अनेक स्थळे एकमेकांना जोडून पर्यटन कॉरिडॉर चा विकास करता येईल
 उद्योगांबरोबर औरंगाबाद ची ओळख असलेली हिमरू शाल, व्यवसाय यांचा विकास करणे करिता व्यवसाय कॉरिडॉर करता येऊ शकतो.पैंठणच्या पैठण्यांनाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल करण्यात आले तर ह्याही व्यवसायाची वृध्दी होईल व कारागीरांना सुगीचे दिवस येतील.


भागवत कराड स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्याकडून मराठवाड्यातील आरोग्ययंत्रणा चा विकास होणे, स्वतंत्र महिला रुग्णालय, औरंगाबाद शहरातील मिनिघाटीला निधी देऊन मिनी घाटी पूर्णक्षमतेने सुरू व्हावी तसेच मराठवाड्यातील सर्व तालुक्यात सक्षम घाटी सदृश्य सिटी, सिटी रुग्णालये उभारणे गरजेचे आहे.
अर्थराज्यमंत्री या नात्याने डॉ. भागवत कराड यांच्या कडुन सर्वांनाच अपेक्षा आहेत मग तो नव्याने उदयास येत असलेले व्यापारी व उद्योजक वर्ग असो वा रखडलेल्या योजनांत प्राण ओतण्यासाठी संघर्ष करणारे सामाजिक संस्था वा सामान्य नागरिक असो. ऑरिक सिटी या प्रकल्पाचे काम होऊन तीन वर्ष होत आली परंतु अजुन तिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली नाही.याचे मुख्य कारण म्हणजे इथे कुशल कामगार वर्ग असला तरी मोठ्या उद्योगांना लागणाऱ्या सुविधा म्हणजेच दळणवळणाची योग्य ती सोय आणि बऱ्याच समस्या आहेत. विमानतळ असले तरी तिथे मोठ्या प्रमाणात उड्डाण करण्याकडे डॉ कराड यांनी भर दयायला हवा. राज्यमंत्रीपद मिळण्याआधीच त्यांनी औरंगाबादच्या उद्योगनगरीला भेट देत सर्व गोष्टी जाणून घेतल्या व या गोष्टींवर भर देवु असेही मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बोलताना त्यांनी सांगितले.ही सुखद बाब. कराड यांना मिळालेल्या महत्वपूर्ण खात्याचे ते नक्कीच सोनं करतील व राज्य सरकार कडुन आल आलेली कामे आणि रेल्वे प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा निधी गोष्टींना निधी प्राप्त करून देण्यासाठी ते केंद्रात पाठबळ देतील अशी अपेक्षा....
अर्थ राज्य मंत्री यांनी विशेष पॅकेज देऊन मराठवाड्याच्या शेतकऱ्याला नेहमीच पडणाऱ्या दुष्काळी परिस्थितीतुन बाहेर पडायला मदत करावी.
 रेल्वे खात्यांतर्गत विशेष शेतकरी रेल्वे चे नियोजन करावे जेणेकरून मराठवाड्यातील पिकांना कालावधीत महाराष्ट्र व देशात जास्तीत जास्त मार्केट उपलब्ध होउ शकते।
रेल्वे राज्यमंत्रीपद या पदालाही न्याय देत रावसाहेब दानवे हे मराठवाड्याला अख्या महाराष्ट्राला रेल्वे रूळाच्या माध्यमातुन जोडतील व मुंबई,पुणेसारख्या शहरा़ची लाईफ लाईन असलेली आग गाडी आपल्या मराठवाड्याचीही जीवनवाहिनी व्हावी अशी आशा. रेल्वे रूळाचे दुहेरीकरण नसल्याकारणाने कित्येक रेल्वेंना येण्यास विलंब होतो... यामुळे बऱ्याचदा रेल्वेचे वेळापत्रक रखडते. मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. बहुतांशी मार्ग हे एकेरीच आहे.रेल्वेगाड्यांची संख्याही कमी असल्याने मराठवाड्याचा प्रवासाचा गाडा हा बऱ्यापैकी खाजगी वाहने व एसटी महामंडळावर अवलंबून आहे. अजूनही मराठवाडा हा रेल्वे संबंधीच्या प्रश्नांवरील उत्तराच्या प्रतीक्षेतच आहे.तर या महत्वाच्या प्रश्नांना दानवे लोकसभेत नक्कीच उपस्थित करतील व ते मार्गी लावण्याच्या दिशेने प्रयत्न करतील हीच महत्वाकांक्षा....
स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत मराठवाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काम केले.परंतु काळाच्या अकाली घावाने त्यांना हिरावले व आपला मराठवाडा पोरका झाला. डॉ. भागवत कराड हे पूर्णतः मुंडेंच्या छत्रछायेखाली शिकले व वैद्यकीय सेवेची जबाबदारी आपल्या पत्नीवर टाकत पुर्णवेळ त्यांनी स्वतःला समाजसेवेसाठी झोकुन दिले. आताच्या राजकीय ‌आलेखात मात्र महाराष्ट्र होरपळला जातोय.

डॉ.भागवत कराड व रावसाहेब दानवे हे सध्यघडीला मराठवाडा व औरंगाबाद साठी खुप महत्वाचे असे प्रतिनिधी आहेत...भाजपला मराठवाड्यात अजुन पाया भक्कम करण्यासाठी ही उत्तम संधी चालून आलीय. तसेच या दोघांनाही औरंगाबादच्या सर्व परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास आहे. दोन्हीही खात्यांमध्ये परस्परसंबंध आहेत. तर दोघांनीही एकमेकांच्या साथीने मराठवाड्याकडे विकास खेचुन आणला तर आपल्या मराठवाड्याच्या राजधानी सगट सर्व मराठवाड्याचे रूपडे पालटेल यात शंका नाही. आपसुकच याच परिणाम भाजपला होईलच . तर बघुयात या दोन राज्यमञ्यांची सांगड कशी जमतेय ते आणि यांच्या विकासाची रेल्वे मराठवाड्यात येवुन धडकते का? तसं याआधीही दानवेआणि कराड यांनी एकत्रितपणे कामे केली आहेत.आणि आता राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण खाते त्यांना मिळाली असुन आता ही समीकरणे कशापद्धतीने आता बदलतात व हे दोन मराठवाड्याचे चेहरे खांद्याला खांदा लावून, कशी जोडगोळी बनवताय व महाराष्ट्राकडे विकास खेचून आणतात यावर सगळ्यांचं लक्ष लागले असेल तरीही त्यांचे डोळे विकासासाठी आसुसले आहेत.राजकारण, सत्ताकारण, संघर्ष यातच आजपर्यंत मराठवाडा ओरबाडला गेला. विकास फक्त कागदावरच.मराठवाडा तर आधीपासूनच समृद्ध आहे, त्याच्या पराक्रमाने, लोकसाहित्यातील कलेने त्याने इतिहास गाजवला आहे.तरीही सर्व गुणसंपन्न असून योग्य ती दिशा न मिळाल्याने मराठवाडा काही बाबतीत मागे राहिला.आता बदलाच्या आशा उमलतांना दिसताय खऱ्या... बघुयात मिळतेय का आपल्या मराठवाड्याला आशा उद्याची.... शाश्वत विकासाची....
.
अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड व‌ रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सदिच्छा..!
     ‌‌
                🖋️🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️🖋️ 

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...